कलियुगातील मनुष्याना त्वरित फळ देणारे व्रत सफला एकादशी, सफला एकादशी कथा, सफला एकादशी व्रत, Safala Ekadashi
सफला एकादशी व्रत कथा
मोक्षदा
एकादशीची व्रत कथा ऐकून अर्जुन प्रसन्न झाला आणि म्हणाला- “हे
कमलनयन ! मोक्षदा एकादशीची उपवास कथा ऐकून मला धन्यता वाटली. हे मधुसूदन ! कृपया
पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीचा महिमा सांगण्याची कृपा करावी. त्या
एकादशी चे नाव काय आहे ? त्या एकादशीला कोणत्या देवाची पूजा
केली जाते आणि त्याचे व्रत करण्यासाठी कोणते यम,नियम काय
आहेत ? कृपया मला हे
सर्व तपशील सांगण्याची कृपा करावी.
अर्जुनाची
उत्सुकता ऐकून श्रीकृष्ण म्हणाले- "हे कुंतीपुत्र ! तुझ्या प्रेमामुळे मी
तुझ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देतो. आता या एकादशीचे व्रत माहात्म्य ऐका- हे
पार्थ ! या एकादशीच्या माध्यमातून भगवान
श्री विष्णूला तुम्ही लवकरच प्रसन्न करून घेऊ शकता. पौष महिन्याच्या कृष्ण
पक्षाच्या एकादशीला 'सफला एकादशी ' म्हणतात.
या एकादशीचे देवता श्री नारायण आहेत. एकादशीच्या दिवशी श्री नारायण यांची श्रद्धापूर्वक उपासना त्यांच्या नियमानुसार करावी. एकादशीला उपवास ठेवणारी व्यक्ती भगवान श्रीहरींना खूप प्रिय आहे. हे पांडू पुत्र ! हे सत्य मानावे कि जसे नागांमध्ये शेषनाग, पक्षांमध्ये गरुड, ग्रहांमध्ये सूर्य-चंद्र, यज्ञांमध्ये अश्वमेध यज्ञ आणि देवतांमध्ये भगवान श्री विष्णू श्रेष्ठ आहेत.
या एकादशीमध्ये लिंब, नारळ, नैवेद्य इत्यादी अर्पण करून नारायण भगवान यांची उपासना केली पाहिजे. मनुष्यला पाच सहस्त्र वर्ष तपश्चर्या केल्यानंतर जे फळ मिळते ते फळ श्रद्धापूर्वक रात्री जागरण करून सफला एकादशी चा उपवास केल्याने मिळते.
या एकादशीचे देवता श्री नारायण आहेत. एकादशीच्या दिवशी श्री नारायण यांची श्रद्धापूर्वक उपासना त्यांच्या नियमानुसार करावी. एकादशीला उपवास ठेवणारी व्यक्ती भगवान श्रीहरींना खूप प्रिय आहे. हे पांडू पुत्र ! हे सत्य मानावे कि जसे नागांमध्ये शेषनाग, पक्षांमध्ये गरुड, ग्रहांमध्ये सूर्य-चंद्र, यज्ञांमध्ये अश्वमेध यज्ञ आणि देवतांमध्ये भगवान श्री विष्णू श्रेष्ठ आहेत.
या एकादशीमध्ये लिंब, नारळ, नैवेद्य इत्यादी अर्पण करून नारायण भगवान यांची उपासना केली पाहिजे. मनुष्यला पाच सहस्त्र वर्ष तपश्चर्या केल्यानंतर जे फळ मिळते ते फळ श्रद्धापूर्वक रात्री जागरण करून सफला एकादशी चा उपवास केल्याने मिळते.
हे कुंती पुत्र ! आता
सफला एकादशीची कहाणी काळजीपूर्वक ऐका-
प्राचीन
काळामध्ये चंपावती नगरात महिष्मान नावाच्या राजा राज्य करीत होता. त्याला चार
मुलगे होते. त्याचा मोठा मुलगा लंपक नावाचा एक महापापी आणि दुष्ट होता
तो नेहमी परस्त्री
गमन आणि वेश्या गमन यामध्ये लिन असायचा. तो नेहमी आपल्या वडिलांचा पैसा या
कामासाठी खर्च करत असे. देवता, ब्राह्मण, वैष्णव
इत्यादींची निंदा, द्वेष, अवहेलना करून
तो खूप प्रसन्न होत असायचा. त्याच्या या दुष्कर्मांमुळे सर्व लोक मनापासून दुःखी
झाले होते, परंतु राजपुत्र असल्याने प्रत्येकने शांतपणे
त्याचा होणारा अत्याचार सहन करण्यास भाग पडले आणि कोणालाही राजाकडे त्याची तक्रार
करण्याची हिम्मत झाली नव्हती, परंतु वाईट काळ जास्त वेळ टिकत
नसतो.
एके दिवशी राजा महिष्मानला लुंपकच्या दुष्कृत्यांबद्दल समजले. मग राजा अत्यंत क्रोधित झाला आणि त्याने लुंपकला आपल्या राज्यातून हुसकावून लावले. वडिलांनी तसेच इतर सर्वांनी राज्यातून लुंपाकला त्याग, बहिष्कृत केला होता. आता तो विचार करू लागला की मी काय करावे? कुठे जायचे? शेवटी त्याने वडिलांच्या राज्यात रात्री चोरी करण्याचा निर्णय घेतला .
एके दिवशी राजा महिष्मानला लुंपकच्या दुष्कृत्यांबद्दल समजले. मग राजा अत्यंत क्रोधित झाला आणि त्याने लुंपकला आपल्या राज्यातून हुसकावून लावले. वडिलांनी तसेच इतर सर्वांनी राज्यातून लुंपाकला त्याग, बहिष्कृत केला होता. आता तो विचार करू लागला की मी काय करावे? कुठे जायचे? शेवटी त्याने वडिलांच्या राज्यात रात्री चोरी करण्याचा निर्णय घेतला .
दिवसा
तो राज्याबाहेर रहायचा आणि रात्री आपल्या वडिलांच्या राज्यात गेला आणि चोरी करणे
आणि इतर वाईट कृत्ये करण्यास सुरवात केली. रात्री तो त्या राज्यतील नागरिकांना
मारणे आणि त्यांचा छळ करीत असे. जंगलात तो निरपराध प्राणी व पक्षी मारुन खायचा.
काही वेळा रात्री तो शहरात चोरी करताना पकडला गेला तरी राजाच्या भीतीने त्याला
पहारेकरी सोडून देत असत. असे म्हटले जाते की कधीकधी कळत नकळतसुद्धा प्राणी
देवाच्या कृपेचा पात्र बनतो. लुंपक यांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले.
तो ज्या वनात राहत होता ते वन सुध्दा भगवंतांना खूप प्रिय होते. त्या जंगलात एक प्राचीन पिंपळाचे झाड होते आणि सर्व देवांचे ते क्रीडास्थान मानले जात असे. वनात महापापी लुंपक त्याच पिंपळाच्या झाडाखाली राहत होता. काही दिवसांनंतर पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या दहाव्या दिवशी कडाक्याच्या थंडीत वस्त्रहीन असल्यामुळे लुंपक बेशुद्ध झाला. थंडीच्या गारठ्यामुळे तो रात्रभर झोपू शकला नाही आणि त्यामुळे त्याचे हात पाय थंडीने आखडले होते. रात्र मोठ्या अडचणीने निघून गेली परंतु सूर्य उगवल्यावरही तो शुध्दीवर आला नाही. तो जसा होता तसाच राहिला.
तो ज्या वनात राहत होता ते वन सुध्दा भगवंतांना खूप प्रिय होते. त्या जंगलात एक प्राचीन पिंपळाचे झाड होते आणि सर्व देवांचे ते क्रीडास्थान मानले जात असे. वनात महापापी लुंपक त्याच पिंपळाच्या झाडाखाली राहत होता. काही दिवसांनंतर पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या दहाव्या दिवशी कडाक्याच्या थंडीत वस्त्रहीन असल्यामुळे लुंपक बेशुद्ध झाला. थंडीच्या गारठ्यामुळे तो रात्रभर झोपू शकला नाही आणि त्यामुळे त्याचे हात पाय थंडीने आखडले होते. रात्र मोठ्या अडचणीने निघून गेली परंतु सूर्य उगवल्यावरही तो शुध्दीवर आला नाही. तो जसा होता तसाच राहिला.
सफला
एकादशीच्या दुपारपर्यंत तो पापी मूर्च्छित राहिला. जेव्हा दुपारच्या उन्हातून
त्याला थोडीशी उष्णता मिळाली, तेव्हा दुपारी त्याला जाणीव झाली आणि कसा
तरी तो त्याच्या जागेवरुन उठला आणि जंगलात अन्नाच्या शोधात गेला. त्यादिवशी तो
शिकार करू शकला नाही, म्हणून तो जमिनीवर पडलेल्या फळांना
घेऊन पिंपळाच्या झाडाखाली गेला. तोपर्यंत भगवान सूर्याने सूर्यास्ताकडे वाटचाल
केली होती.
भूक लागल्यानंतरही तो ती फळे खाऊ शकला नाही, कारण तो जिवंत प्राण्यांना मारुन त्यांचे मांस खात असे. त्याला हे फळ अजिबात खायला आवडत नव्हते, म्हणून त्याने ती फळे पिंपळाच्या मुळाजवळ ठेवली आणि दुःखाने म्हणाला - 'हे देवा ! हे फळ तुला अर्पण केले आहे. आपण या फळांनी तृप्त व्हा. असे म्हणत तो रडू लागला आणि त्याला त्या रात्री झोप सुद्धा आली नाही. तो रात्रभर रडत राहिला.
अशा प्रकारे त्या पापीकडून एकादशीचा कळत नकळत उपवास घडला गेला. भगवान श्रीहरि या व्रतामुळे आणि त्या रात्री च्या जागरणामुळे अत्यंत प्रसन्न झाले आणि त्याच्या सर्व पापांचा नाश झाला. पहाट होताच एक दिव्य रथ अनेक सुंदर वस्तूंनी सजलेला त्याच्या समोर येऊन उभा राहिला. त्याच वेळी आकाशवाणी झाली - 'हे राजकुमार ! भगवान श्री नारायणाच्या कृपेने तुमची सर्व पापे नष्ट झाली आहेत, आता आपल्या वडिलांकडे जा आणि राज्य मिळवा. '
भूक लागल्यानंतरही तो ती फळे खाऊ शकला नाही, कारण तो जिवंत प्राण्यांना मारुन त्यांचे मांस खात असे. त्याला हे फळ अजिबात खायला आवडत नव्हते, म्हणून त्याने ती फळे पिंपळाच्या मुळाजवळ ठेवली आणि दुःखाने म्हणाला - 'हे देवा ! हे फळ तुला अर्पण केले आहे. आपण या फळांनी तृप्त व्हा. असे म्हणत तो रडू लागला आणि त्याला त्या रात्री झोप सुद्धा आली नाही. तो रात्रभर रडत राहिला.
अशा प्रकारे त्या पापीकडून एकादशीचा कळत नकळत उपवास घडला गेला. भगवान श्रीहरि या व्रतामुळे आणि त्या रात्री च्या जागरणामुळे अत्यंत प्रसन्न झाले आणि त्याच्या सर्व पापांचा नाश झाला. पहाट होताच एक दिव्य रथ अनेक सुंदर वस्तूंनी सजलेला त्याच्या समोर येऊन उभा राहिला. त्याच वेळी आकाशवाणी झाली - 'हे राजकुमार ! भगवान श्री नारायणाच्या कृपेने तुमची सर्व पापे नष्ट झाली आहेत, आता आपल्या वडिलांकडे जा आणि राज्य मिळवा. '
लुंपकांनी जेव्हा ही
आकाशवाणी ऐकली तेव्हा तो फार प्रसन्न झाला - 'हे
प्रभु ! आपली जयजयकार असो ! असे बोलून त्याने सुंदर कपडे घातले व मग वडिलांकडे
गेला. वडिलांकडे पोहचल्यावर त्याने संपूर्ण गोष्ट वडिलांना सांगितली. मुलाच्या
तोंडून सर्व वृत्तांत ऐकल्यानंतर वडिलांनी ताबडतोब आपले संपूर्ण राज्य मुलाच्या
स्वाधीन केले आणि ते स्वत: जंगलात गेले. आता लुंपक शास्त्रानुसार राज्य करू लागला.
त्यांची पत्नी, पुत्र इत्यादी देखील श्री विष्णूचे परम भक्त झाले. वृद्धावस्थेत पोहोचल्यानंतर त्याने आपल्या मुलाच्या ताब्यात राज्य सुपूर्त केले आणि देवाची उपासना करण्यासाठी जंगलात जाऊन त्याची उपासना केली आणि शेवटी उच्च स्थान प्राप्त केले.
हे पार्थ ! ज्यांनी या सफला एकादशीला विश्वासाने व श्रद्धापूर्वक व्रत केले त्यांचे सर्व पाप नष्ट होतात आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो. हे अर्जुन! ज्यांना या सफला एकादशीचे महत्त्व समजत नाही, त्यांना शेपटी व शिंगे नसलेले प्राणी मानले पाहिजे. सफला एकादशीचे माहात्म्य वाचून किंवा ऐकून त्या प्राण्याला राजसूय यज्ञासारखेच फळ मिळतात. "
त्यांची पत्नी, पुत्र इत्यादी देखील श्री विष्णूचे परम भक्त झाले. वृद्धावस्थेत पोहोचल्यानंतर त्याने आपल्या मुलाच्या ताब्यात राज्य सुपूर्त केले आणि देवाची उपासना करण्यासाठी जंगलात जाऊन त्याची उपासना केली आणि शेवटी उच्च स्थान प्राप्त केले.
हे पार्थ ! ज्यांनी या सफला एकादशीला विश्वासाने व श्रद्धापूर्वक व्रत केले त्यांचे सर्व पाप नष्ट होतात आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो. हे अर्जुन! ज्यांना या सफला एकादशीचे महत्त्व समजत नाही, त्यांना शेपटी व शिंगे नसलेले प्राणी मानले पाहिजे. सफला एकादशीचे माहात्म्य वाचून किंवा ऐकून त्या प्राण्याला राजसूय यज्ञासारखेच फळ मिळतात. "
कथा सारांश
या
सफला एकादशीची कहाणी आपल्याला भगवान श्री विष्णू दयाळू आहेत हे दर्शवित आहे. जर एखाद्या व्यक्तीने कळत नकळत जरी परमेश्वराला
आठविले तर त्याला त्याचे पूर्ण फळ प्राप्त होते. जर मानवांनी त्यांच्या पापांची
क्षमा मागितली तर देव त्याच्या मोठ्या पापांनाही क्षमा करतो. लुंपकांसारखे
महापापीसुद्धा भगवान श्रीहरींच्या कृपेने वैकुंठाचे अधिकारी झाले. तर तुम्ही आम्ही
का होऊ शकणार नाही......
ओम नमो भगवते
वासुदेवाय नमः
आपल्यासाठी अजून काही उपयुक्त लिंक्स आम्ही देत आहोत.
त्याचा आपण पुरेपूर उपभोग घ्यावा.
hi...
ReplyDelete